Press "Enter" to skip to content

रामदास शेवाळे यांची “किमया”

मुस्लिम बांधवांच्या हस्ते हनुमानाची महाआरती : एकाच ठिकाणी देवाचा भंडारा आणि इफ्तार पार्टी

कळंबोलीत अनोख्या राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

सिटी बेल • कऴंबोली •

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून मशीदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा याबाबत वादविवाद सूरु केला असताना शिवसेना पनवेल महानगरपालिका शहर क्षेत्रातर्फे एकाच मंडपाखाली हनुमान जयंतीचा भंडारा आणि रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन शनिवारी कळंबोली वसाहतीमधील बिमा काॅम्पलेक्सच्या मारुती मंदीरात करण्यात आले होते. विशेष म्हणजे हनुमान मंदिरामध्ये मुस्लिम बांधवांनी भगवी शाल परिधान करून हातात आरतीचे ताट घेऊन हनुमानाची महाआरती केली.

शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी हा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांत लोखंड बाजारातील सय्यद हवालदार व फारुक हाजी यांच्यासारखे व्यावसियांकासोबत सूमारे ५० मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.

हा अनोखा उपक्रम नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत साजरा झाला. शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माचा आदर करून जातीय सलोखा कसा राखावा हा आदर्श रामदास शेवाळे यांनी उभ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे.

महाराष्ट्रात कायदा सुरक्षितता राखली गेली पाहिजे. असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज कळंबोलीतील बीमा कॉर्नर येथील हनुमान मंदिरात दर वर्षी प्रमाणे हनुमान जन्मोत्सव, भंडारा आणि महाआरतीचे करण्यात आले होते. यावर्षी मात्र सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसावी म्हणून आम्ही हनुमान मंदिरातील महाआरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्याचे ठरवले. तसेच ज्याठिकाणी हनुमानाचा भंडारा होतो त्याच ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी इस्तारी चे देखील आयोजन केले होते. मुस्लिम बांधवांनी भगवी शाल परीधान करून, आरतीचे ताट हातात घेऊन भक्तिभावाने केलेली हनुमानाची आरती उभ्या महाराष्ट्राने पाहावे आणि यातूनच दुसऱ्या धर्माचा आदर कसा करावा हा बोध घ्यावा. ‌ जर भोंगे लावायचेचं असतील तर त्यावर वंदे मातरम् हे गीत लावा. त्यामुळे देशवासीयांमध्ये एकात्मतेची भावना जागृत होईल. ‌ – रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.