Press "Enter" to skip to content

गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर

कोकणासाठी कोकण रेल्वेच्या 14 स्पेशल गाड्या

सिटी बेल • मुंबई •

कोकण रेल्वेने चाकरमान्यांना मोठी खुशखबर दिली आहे. आगामी काळातील सुट्टय़ा लक्षात घेता 14 विशेष गाडय़ा सोडण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे.

उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल – मे दरम्यान दरवर्षी चाकरमानी मोठय़ा संख्येने सहकुटुंब कोकणात येतात. त्यांचा हा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासन लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान 14 उन्हाळी विशेष गाडय़ा सोडणार आहे. या विशेष गाड्या 7 एप्रिलपासून ते 20 एप्रिलदरम्यान धावणार आहेत.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.