Press "Enter" to skip to content

बांद्यापासून चांद्यापर्यंत महाराष्ट्रभरातून पाठवली जाणार पत्र…

मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठविण्यास महाराष्ट्राचे प्रवेश द्वार बांदा – सिंधुदुर्ग येथून भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली सुरुवात…

सिटी बेल | पनवेल |

राज्यातील महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक घाई घाईने पारित करून घेतले. या काळया विधेयकाच्या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या , विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का ? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत. या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठवित आहेत. याची सुरुवात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रवेश द्वार बांदा- सिंधुदुर्ग येथून आज केली आहे. तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव अमृत मारणे,सुजित थिटे,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.