. धागे
नाती हवी असतात
तुटल्यावर हे समजते
धागा विणायला कष्ट पडतात
कोळ्यालाच ते कळते…..
कळी होऊन तेव्हा
फुल वेलीवर उमलते
थोडा वेळ लागतोच
मग नाते जरा मुरते
मुरते तेव्हाचव येते
नात्यांमध्ये असेच असते
सर्व जेव्हा एक होते
आणि मी पण संपते
बघता बघता जाईल
काळ सरुन मागे
मग कुठला कोळी
आणि कोण कुठले धागे?
मनोज भागवत,
लांजा, रत्नागिरी
Be First to Comment