Press "Enter" to skip to content

वि दी र्ण

वि दी र्ण

चल रे गड्या आता थांबू नको
दमलास तू तरी थकू नको
अवघड असली जरी ही वाट
गड्या फिरवू नको तुझी पाट

आता पूर्वीसारखी दुनिया नाही राहिली
सारी दुनियाच आत्मकेंद्रीत झाली
एकदा का सोडली साथ नशिबाने
मन मारून जगावे लागते रे मुकाट्याने

माझं माझं म्हणून आता काही नाही उरलं
कशातच मन लागत नाही ते उरलं सुरलं
आता ऐकेक दिवस नुसता ढकलायचा
पूर्वीच्याच आठवणीत आनंद मानायचा

सांगा! सदा सर्वदा मनासारखे कसे रे घडेल
कोणा कळले आहे का, की नियती केव्हा नडेल?
आपले ओझे आपल्याला वहायचे असते
सकारात्मक विचाराने फक्त ते हलके करायचे असते

आपल्या कर्माचेच फलीत हे ओझं असते
तरुणपणी हे ओझं अजिबात जाणवत नसते
म्हातारपणी हे ओझं आता मानेला पेलवेना
कणाच मोडलाय तर मान कशी साथ देईल सांगा ना?

खरं सांगतो! आम्हाला नको तुमचे सोने नाणे
आता फक्त हवे दोन गोड शब्दाचे बोलणे
शेजारी बसून हातातहात घेऊन मायेने विचारपूस करणे
तरच उतरत्या वळणावर होईल हे सुखकर जीणे

विलास चव्हाण
सातारा रोड ( पाडळी )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.