कविता
कधी षोडशवर्षीय तरुणी
असते कविता
तर कधी तरणाबांड युवक असते कविता
कधी नववधू स्वप्नाळू असते कविता
तर कधी स्वप्नपूर्तीचा आनंद असते कविता
कधी अंगाई असते कविता
तर कधी बोट धरून चालविते कविता
कधी भांडण असते कविता
तर कधी समेट असते कविता
कधी आयुष्याचा पूर्वार्ध असते कविता
तर कधी उत्तरार्ध असते कविता
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असते कविता
म्हणूनच सर्वांची असते कविता
अशा कवितांमुळे जगणे सुंदर आहे
म्हणून आयुष्यात कविता असणे गरजेचे आहे
अनघा अंबपकर, नवीन पनवेल







Be First to Comment