निर्भया??😢
रोजचेच हरणे, मिटणे आणि केवळ सहनच करणे ..
का नच शिक्षा नराधमांना? नशिबी केवळ रडणे ?
उघड्या नयने काय पाहतो ?जळणे आणि विव्हळणे …
उमलत्या कळ्यांना राजरोस ते असे खुडूनि टाकणे ?
कसले शिक्षण देतो आम्ही ?कुचकामी ते ठरले
नकार नाही पचतच यांना, म्हणुनि उभे जाळणे ?
पराकोटीचे क्रौर्य घडे ,परि शांत कसे हे सगळे ?
का यांना अम्ही निवडून द्यावे?संधिसाधू ते बगळे ..
न्यायव्यवस्था अंध आमुची , पाही न डोळसपणे ..
दुष्ट हिंडती वर मानेने , मुश्किल इथले जिणे ..
अगतिकतेने हतबल होऊन ,किती किती साहणे ?
जगायचे नाकारुनी हाती ,अमुच्या केवळ मरणे ???
ऊर्मिला ताम्हनकर, सांगली







Be First to Comment