Press "Enter" to skip to content

ते निष्पाप_जीव

ते निष्पाप_जीव

उगवलेली कळी उमलण्या आधीच जळाली
निष्पापांचा जीव घेऊन इहलोकी वळाली

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वाजलेलेच तीनतेरा
कधी संपणार हा सरकारी अनास्थेचा फेरा

मुर्दाडांचा समाज खोटी आसवे गाळी
नवजात बालकांच्या अकाली जाण्याचे लिहिले होते का भाळी..?

चार दिस सरता विसरेल समाज सारे
हळूच विरले जाईल या दुर्घटनेचे वारे

दुर्घटनांचे दुष्टचक्र हे कधी थांबायचे नाही
जोवर आपण बंद केलेले डोळे उघडणार नाही

भंडार्‍याच्या आगीत निष्पाप बालके जळाली
जागलो नाही आता तर बसेल आपल्यालाही झळाळी

आता तरी जागा रे, करा आवाज अपुला बुलंद
धजावेल ना कोणी उघडण्या भ्रष्टाचाराची दारे बंद…

संदिप तांबे, माहीम, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.