Press "Enter" to skip to content

नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज : मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली ###

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत झाल्याचे वृत्त आहे. विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. ही बैठक मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. १५ ऑगस्टनंतर दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.