Press "Enter" to skip to content

विरह

विरह

आज वाटे माझ्या मनी
आभाळ आले भरूनी
भाव दाटले मनीचे
लोचने ही पाणावली

जलदाचे मेघ कसे
बरसावे अंगणी
आसवांचा बांध फुटूनी
ओघळावे गालावरी

झालेली खोल जखम
पुनरपी जागावी
बांध घातला तरी
पुन्हा हुळहुळावी

पक्षिणी विरहाने
कशी व्याकुळ व्हावी
ह्रदयाची तगमग तशी
पुन्हा पुन्हा जागावी

आज उदासीन वारा
ना हलवी पानेफुले
जणू मनाचे प्रतिबिंब
मज त्यात ही दिसे

मनाला कसे आवरू
हे ना कळाले
पुन्हापुन्हा आठवणीत
मन हे गुतवावे

नयना पेंढारकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.