सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
सन 1968 साली दहावी ( मॅट्रिक ) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम,खोपोली येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. 2017 झाली पहिला मेळावा पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळा सोडल्यानंतर पन्नास वर्षात कधीही न भेटलेल्या, 40 वर्ग मित्रांची प्रथमच गाठ भेट झाली. यामध्ये 15 वर्ग मैत्रिणींचा ही समावेश होता.
बडोदा,पुणे ,मुंबई, पनवेल, पेण अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. त्यानंतर दरवर्षी विविध ठिकाणी हे स्नेहसंमेलन संपन्न झाले. सात फेब्रुवारी रोजी खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अॅड. श्रीकांत पाटणकर यांच्याहस्ते करण्यात आले. या स्नेहसंमेलनाला 38 मित्र-मैत्रिणींनी आपला सहभाग नोंदविला. या स्नेहसंमेलनात पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आनंद देवधर यांनी आपल्या कलाकृती आणि सुप्रसिद्ध व्यक्तींबरोबर झालेल्या गाठीभेटी, यासंबंधीच्या आठवणींचे एक पुस्तक तयार केले आहे. तसेच पत्रकार रमेश भोळे यांनी साईंचे सोबती हे पुस्तक लिहिले आहे या दोघांचा सत्कार ही, त्यांच्या मित्रांनी यावेळी केला. खालापूर तालुक्यातील खोपोलीचे वर्गमित्र वालचंद ओसवाल, आशा दामले, सुरेन जाधव, शांतीलाल पूनमिया, लक्ष्मण पाटील, यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
पुढील स्नेहसंमेलन विजय वनगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आला.यावेली एक्कावन्न वर्षांनंतर एकत्र आलेल्या सध्या जेष्ठ नागरिक असणा-या शाळकरी मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता केली.








Be First to Comment