सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
उत्तरप्रदेशात मुलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा रायगङ जिल्हा संघर्ष समितीने निषेध करत खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन दिले आहे.अत्याचार प्रकरणी पंतप्रधानानी लक्ष घालावे तसेच उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे अशी मागणी संघर्ष समितीने निवेदनाव्दारे केली आहे.
दोषीना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी चांगला वकिल आणि विशेष न्यायालयाची नियुक्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
तहसीलदाराना निवेदन देण्यासाठी रायगङ जिल्हा संघर्ष समितीचे यशवंत गायकवाङ, ॲड. तृप्ती आर्ङे,कैलास गायकवाङ,मिलिंद सोनावणे,सदाशिव कवङे,जागृती जाधव,सारिका केदारी,प्राजक्ता गायकवाङ,नरेश मणेर,संतोष कांबळे,शरद केदारी,अनिल गायकवाङ,वैभव केदारे,गोपीनाथ सोनावळेसह सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment