Press "Enter" to skip to content

रानमाळावर उगविलेल्या गवतामुळे, गुरांच्या चार्‍याचा प्रश्न मार्गी

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

कोकणातील बहुतेक शेतकरी शेती व्यवसाय बरोबर पशु पालन करीत असल्यामुळे पशु पासून मिळणा-या उत्पनापासून रोजच्या दैनंदिन जिवनात अर्थिक ची कमतरता भासत नाही. घरासमोर पशुधन असल्याने त्याचा उपयोग शेतीसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी होत असतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत निर्माण झाल्यामुळे गुरांची चा-या आभावी उपास मारी होत नाही.माळरानावर गवत निर्माण झाल्यामुळे काही तीन महिने चा-याचा प्रश्न मार्गी लागत आहे.

पावसाला संपला की पशुधन पाळणे शेतक- यांना मोठ्या कष्टाचे होते.कारण पावसाळ्यात निर्माण झालेले गवत उन्हाळी सुकून जाते.आणि शेतक-याला या सुकलेल्या गवताचा पेंढा म्हणून उपयोगात येत असते.परंतू दर वर्षी उन्हाळ्यात काही व्यक्ती डोंगराळ भागात वणवे लावत असल्याने सुकलेले गवत जळून खाक होते.यामुळे गुरांना उपासमारीची वेळ निर्माण होत असते.

दर वर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत निर्माण होत असल्याने गुरांचा चार महिने चार-यांचा प्रश्न सुटत असतो.शिवाय मुबलक चारा मिळत मिळत असल्याने दुग्ध व्यवसाय हि तेजीत असतो,पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत निर्माण होत असल्याने गृरांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लागत आहे.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी असलेले जलाशय पाण्याने पूर्ण भरले असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो.यामुळे पावसाळ्यात गुरे पाळणे सोयस्कर होते.परंतू आठ महिने मोठ्या कष्टाचे काढावे लागतात.अशी खंत गुरे चारण्यासाठी माळरानावर आणलेल्या शेतक-यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.