Press "Enter" to skip to content

पावसाच्या आगमनाने शेतक-यांस दिलासा

शेतीच्या कामात बळीराजा मग्न : तालुक्यात काही ठिकाणी लागवडीस प्रारंभ

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

पावसाचे आगमन होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते.मात्र मागील १० दिवसांपासून पावसाने चांगलाच दिलासा दिल्यामुळे शेतामध्ये खूप पाणी जमा झाले आहे.यामुळे बळीराजा शेतीच्या कामात मग्न झाल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.वेळेवर पाऊस आला असता तर राब तयार होऊन , भात लागवडीस प्रारंभ झाले असते.मात्र एका आठ्यावड्यात आत भात लागवडीस प्रारंभ होईल.असे मत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.

पावसाचे आगमन होत नसल्यामुळे भात शेती जणू कोरडी पडत होती शेतातील तयार होत असलेले राब करपून जाण्याच्या स्थितीत असताना वरून राजाने शेतक-यांस चांगलाच दिलासा दिला आहे.दिवसभरातून पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे.पुन्हा एकदा बळीराजा शेतीच्या मशागतीकडे वळले आहे.शेतामध्ये चिखल करणे,तण, उपटणे अदी कामाने जोर धरलेला पाहावयास मिळत आहे.

पावसाच्या सरी भात पेरणी केल्यापासून येत असत्या तर शेतात राब तयार झाले असते.मात्र पावसाने दगा दिल्यामुळॆ शेतीच्या लागवडीच्या कामाला ब्रेक मिळाला होता.मात्र वरून राजानं पुन्हा एकदा कृपा दृष्टी केल्यामुळे एका आठवड्याच्या आत मध्ये भात लागवडीस सुरुवात होईल.आता शेतामध्ये खूप पाणी जमा झाले असून भात लागवड पुरेसे पाणी जमा झाले आहे.कारण पाणी नसेल तर भात लागवड पूर्ण होणार नाही.यामुळे ह्या पावसाच्या सरी सातत्याने पडत राहूदे यामुळे बळीराजा शेतीच्या लागवडीस खंभीर पणे उभा राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.