Press "Enter" to skip to content

तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून तालुक्यात संजीवनी कृषी सप्ताह दिनांचे आयोजन

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून २५ जून ते १ जुलै हा कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह आयोजन करण्यात आले.असून प्रत्येक कृषी सहाय्यक गावपातळीवर जावून खरीप हंगामातील राबवण्यात विविध योजना भात लागवड,आधुनिक तंत्रज्ञान,सगुना राईस तंत्रज्ञान, चारसूत्री,भात लागवड, पट्टा पद्धतीने असे मार्गदर्शन वयाल,होराळे, तळवली,चावणी,जांबरुग,होनाड या गावात जावून शेतकऱ्यांस मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच ज्या कृषी सहाय्यक कडे गावे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस भात लागवड कमी होत असतांना शिवाय जमिनीची विभागणी तुकड्यात होत असतांना भात शेती मध्ये घट होत चालली भाताचे उत्पन्न वाढावे या दृष्टीकोणातून खालापूर तालुका कृषी अधिकारी नविन तंत्रज्ञान शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचे तसेच त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले.जणे करून भाताचे उत्पन्न वाढले जाईल.त्याचबरोबर चारसुत्री हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.शेतीचा बांध हा पडीक न राहता खरीप हंगामात त्याच्यावर सुद्धा काहीतरी लागवड करता येइल या विचारांतून माहिती देण्यात आली.

त्याचबरोबर आरोग्य प्रभाव आधारित खताचा संतुलित वापर 10% टक्के खतांची बचत कीड व रोग संरक्षण काढणी पश्‍चात तंत्रज्ञान व भात शेती कृषी विभाग योजना विषयी माहिती व प्रशिक्षण सभा आणि श्रेणी भेटी या द्वारे देण्यात आले.१ जुलै रोजी खालापूर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, प्रगती शेतकरी,कृषिमित्र,कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी, जिल्हा परिषदेचे सदस्य सहभागी होणार आहेत.या सर्व बाबीचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ ( नारनवर ) यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.