Press "Enter" to skip to content

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष !

आपटा फाटा-रसायनी रस्ता बनला मृत्यु चा सापळा ! अपघाताच प्रमाण वाढलं

सिटी बेल | रसायनी |

आपटा फाटा ते रसायनी हा रस्ता मुंबई – गोवा महामार्गाला जोडणारा अंतर्गत रस्ता आहे . गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करून सुद्धा रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही .

मोठं – मोठे खड्डे असल्या कारणाने दुचाकी वाहकांचे अपघात होत असतात . मागील 15 दिवसांत 4 अपघात घडले .त्यामधील आपटा गावातील ग्रामस्थ विलास कदम यांच्या हाटाला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाला . मुख्य रस्त्यावर फ़रशी आहेत , आपटा फाटा एच.सी.सी कंपनी चौक च्या पुढे वळणदार रस्ता आहे . तिथे फरशी खालील भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे , नवीन प्रवाशांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्यु च द्वार च आहे . त्याचप्रमाणें आपटा गावातील रेल्वे ब्रिज जवळ अश्याच प्रकारची समस्या पाहायला मिळते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने झाडे – झुडुपांच प्रमाण जास्त आहे . ही झाडे रस्त्यावर पडत असतात. त्याची कापनी होत नसल्याने सुद्धा अपघातास आमंत्रण दिले जाते .

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टिळे साहेब यांना विचारले असता , उडवा- उडवी ची उत्तरे मिळतात. आजतागायत हीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याने सदर परिसरातील नोकरवर्ग , वाहनचालक , ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भविष्यात जर ह्या खड्ड्या मुळे अपघातात मृत्युमुखी झालं तर सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल का असा प्रश्न आपटा गावातील शिवसैनिक स्वप्नील भोवड यांनी उपस्थित केला आहे .

स्थानिक आमदार लक्ष केंद्रित करत नसल्याने त्याच प्रमाणे कंत्राटदार जे काम करतो ते नित्कृष्ट दर्जाचं असल्या कारणानें विभागातिल ग्रामस्था मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेल दिसत. प्रशासन व लोकप्रतिनिधी च दुर्लक्ष करेल तर जनतेच्या समस्या सोडिवणार कोण ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय ?

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.