सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गेले आठ दिवसांपासून परिताता पाऊस धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतकऱ्यांना तोंडचे पाणी पळाले आहे. उतरा नक्षत्रामुळे भात शेती अडवी झाली त्याच बरोबर हस्त नक्षत्र सुरु झाल्यापासून गेले दिवस या पावसाने आपले रुप दाखविले यामुळे अगोदरच भात शेती अडवी झाली असून त्यातच पावसामुळे भात शेती कुजली जात आहे उन्हाचा प्रखर वाढत असतांना भाताच्या लोंब्यापासून दाणा अलग होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचविण्यासाठी नामी शक्कल,काढून काठीच्या साहाय्याने पडलेली भात शेती केली असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
परतीच्या पावसाने भात शेतीचे नुकसान होवू नये शिवाय आपल्याला जास्त प्रमाणात भाताची कणसे मिळावी या दृष्टीकोणातून शेतावरील असलेल्या झाडाच्या फाद्याची छोटी छोटी लाकडे घेवून ती जमिनीत रोवून ती भाताची कणसे एकत्र करून या रोवलेल्या लाकडांना बांधण्यात शेतकरी वर्गांनी कंबर कसली आहे जेणे करून लोंब्यानां आलेला भात कणीस खराब होवू नये शिवाय शेतामध्ये खूप पाणी जमा झाल्यामुळे पेंढा सुद्धा खराब होवू शकतो यामुळे गुरांच्या चा-यांची मोठी समस्या निर्माण होवू शकते यामुळे भात शेती समवेत गुरांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लावणे हे सुद्धा विचारांत घेवून शेतकरी आपली पिके आणी पेंढा वाचविण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवित आहे.
परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उमठत असल्यामुळे हातात हवे तेवढे धान्य मिळत नसल्यांची खंत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. मात्र त्या वरुन राजावर भरवसा ठेवून आपल्याला दिलेले काम करीत राहत असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
Be First to Comment