Press "Enter" to skip to content

शेतामध्ये पाणी साचल्यामुळे भात शेती कुजली जाण्याची शक्यता

गुलाब चक्रीवादळामुळे भात शेतीचे मोठे नुकसान, डोळ्यादेखत उभी पिके झाली आडवी

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुलाब चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाउस पडत असल्यामुळे त्यातच भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होत असतांना त्यांच्या वजनांने भात शेती पडत असून मोठे नुकसान होत आहे.

शिवाय शेतामध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी जमा झाल्यामुळे त्यातच भात शेती पडल्यामुळे भात शेती कुजली जात आहे.त्याच बरोबर भाताच्या लोंब्यापासून दाणा अलग होत असून कुजण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

मातीत टाकलेला पैसा डोळ्यादेखत वाया जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या काही वर्षात शेती करण्यास शेतकरी वर्ग पाठ फिरवत आहे.त्याच बरोबर मजुर खर्च, नांगरणी ,लागवड ते कापणी पर्यंत मोठा खर्च होत आहे.मात्र त्यांची पर्वा न करता काही शेतकरी वर्ग शेती करीत आहे. त्याच बरोबर शेतीची विभागणी झाल्यामुळे शेतीचे तुकड्यात रुपांतर झाले आहे.

मात्र असे असुनही अल्प भुधारक शेतकरी शेती करीत आहे.मात्र लागवड झाल्यानंतर ते भात कापणी होइ पर्यंत शेतकरी वर्गांपुढे मोठे आवाहन असते.मात्र भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असतांना दर वर्षी भात शेती पडत असते.यामुळे शेतकरी दर वर्षी मोठ्या आर्थिक संकटात सापडत असतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.