तालुका कृषी अधिकारी यांचे शेतकरी वर्गांना पिक विमा काढण्याचे आवाहन
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
शेतकरी शेती करीत असतांना वातावरणात केव्हा चांगले असेल यांची शास्वती नाही. शिवाय ओला किंवा कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान होत असते. माती मध्ये टाकलेला पैसा वसुल होत नसल्यामुळे शिवाय डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी वर्गापुढे अनेक समस्या निर्माण होत असतात. तसे होवू नये पिकाला सर्वक्षण मिळाले पाहिजे या उद्दात विचारांतून शासनाने खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक १५ जुलै २०२१ अशी होती. तथापि केंद्र शासनाचे दिनांक १५ जुलै २०२१ चे पत्रान्वये योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक २३ जुलै २०२१ अशी केली आहे. तरी शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
त्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक , मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी आपण पिक कर्ज जा बँकेतून घेतले आहे. तिथे व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मध्ये जाऊन आपला पिक विमा भरावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ- नारनवर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
Be First to Comment