Press "Enter" to skip to content

परतीच्या पावसाने

परतीच्या पावसाने

परतीच्या पावसाने सगळ्यांची झाली दैना
बळीराजाच्या डोळ्यांचं
पाणीच खळेना

पीक सारं गंगामाई गेली
रात्री घेऊन
झोपेचं भय मनात
आलं दाटून

राजासारखाच तू लहरी
कुणाच्या जाऊ दारी
अपेक्षांचं ओझं आता
देऊ कुणाच्या माथ्यावरी

माहीत नाही मला
कधी बदलतील नशिबाच्या रेषा
कधी मिळेल बळीराजाला भविष्याची उज्वल दिशा

सोसून सारं करतो काळ्या आईची सेवा,
घाम गाळून ,कष्टाची भाकरी मिळावी हेच मागणे तुज पायी देवा.

नाही करणार अयोग्य विचार,शोधून
काढेन नवीन काही,कधीतरी नक्कीच होतील दिशा मोकळ्या दाही

सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.