Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची प्रशासनाकडे मागणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । विट्ठल ममताबादे । 🔶🔷🔶

अतिवृष्टि मुळे झालेल्या पावसामुळे उरण पनवेल तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.परतीच्या पावसामुळे पनवेल- उरण तालुक्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मा- जिल्हाधिकारी अलिबाग, मा-तहसीलदार पनवेल, मा- तहसीलदार उरण, मा -प्रांत अधिकारी पनवेल यांना निवेदन देण्यात आले.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था ही सामाजिक संघटना असून विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात. अडीअडचणीत सापड़लेल्या गोर गरीबांना संस्थेमार्फत मदतीचा हात दिला जातो.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ, उपाध्यक्ष भारत भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष विवेक भोपी,उरण तालुका अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.