Press "Enter" to skip to content

गोफण गावच्या सावित्री बाई कडू यांचे दु:खद निधन

सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)


रोहा तालुक्यातील गोफण गावच्या रहिवाशी सावित्रीबाई गणपत कडू यांचे ६ जुलै रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले मृत्यू समयी त्या ९५ वर्षा च्या होत्या सावित्री बाईचा स्वभाव हा खुप मनमिळाऊ व प्रेमळ होता त्या वारकरी होत्या त्यांचे माहेर हे तिन्वीरा अलीबाग येथील होते. परंतू वास्तव्य मुंबई येथे होते. मुंबईला राहुन देखील त्यांनी काळात गोफण या खेडे गावात या गावचे सामजिक कार्यकर्ते गणपत कडू यांच्याशी विवाह केला. तेथें राहुन त्यांनी अपल्या मुलांचा कुटुंबाचा सांभाळ केला.तर पतीच्या निधना नंतर त्यानी १९ वर्षेआपल्या मुलांना चांगला सहवास दिला आज त्यांचे कुटुंब सुशिक्षीत सुसंस्कारित आहे
गोफण गावचे राष्ट्रवादी कार्यकर्ते रघुनाथ कडू,बंड्या कडू यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात मुले,सूना,नातू,जावई असा ६० जणांचा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रियाविधी बुधवार १५ तर तेरावे शनि. १८ रोजी गोफण या रहात्या घरी होणार असल्याची महिती देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.