Press "Enter" to skip to content

हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले : तासी १८ कोटी लिटर पाण्याचा विसर्ग

नदी व खाडीकिनारी ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण (  प्रशांत पोतदार) ✳️💠✳️💠

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या हेटवणे धरणाचे ६ दरवाजे २ फुटांनी आज उघडण्यात आले. आठवड्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे पेण तालुक्यातील हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी ४  दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत हेटवणे धरणाचे ६  दरवाजे २  फुटांनी उघडले आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४६  दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला ६  दरवाजे असून या दरवाजाची उंची ३ मीटर आहे. सदरचे दरवाजे तूर्त फक्त २  फुटांनी उघडले आहेत. या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद प्रति सेकंद ५०  हजार लिटर प्रमाणे प्रती तास १८ कोटी लिटर प्रमाणे होत आहे. त्यामुळे भोगावती नदी किनाऱ्यावरिल व खाडीकिनाऱ्यावरील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.

 – घाबरू नका काळजी घ्या

नदी व खाडी किनारील नागरिकांनी घाबरू नये. कारण या विसर्गामुळे कोणत्याही प्रकारची पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतु नागरिकांनी काळजी मात्र घेणे गरजेचे आहे. नदी व खाडी मध्ये विनाकारण पोहण्याकरिता तसेच मच्छिमारी करिता जाऊ नये. त्याचप्रमाणे अतिउत्साहाने सेल्फी काढण्याकरिता सुद्धा नदी व खाडी किनारी जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जाधव व उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.