नदी व खाडीकिनारी ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रशांत पोतदार) ✳️💠✳️💠
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या हेटवणे धरणाचे ६ दरवाजे २ फुटांनी आज उघडण्यात आले. आठवड्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे पेण तालुक्यातील हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी ४ दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत हेटवणे धरणाचे ६ दरवाजे २ फुटांनी उघडले आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४६ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला ६ दरवाजे असून या दरवाजाची उंची ३ मीटर आहे. सदरचे दरवाजे तूर्त फक्त २ फुटांनी उघडले आहेत. या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद प्रति सेकंद ५० हजार लिटर प्रमाणे प्रती तास १८ कोटी लिटर प्रमाणे होत आहे. त्यामुळे भोगावती नदी किनाऱ्यावरिल व खाडीकिनाऱ्यावरील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
– घाबरू नका काळजी घ्या
नदी व खाडी किनारील नागरिकांनी घाबरू नये. कारण या विसर्गामुळे कोणत्याही प्रकारची पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतु नागरिकांनी काळजी मात्र घेणे गरजेचे आहे. नदी व खाडी मध्ये विनाकारण पोहण्याकरिता तसेच मच्छिमारी करिता जाऊ नये. त्याचप्रमाणे अतिउत्साहाने सेल्फी काढण्याकरिता सुद्धा नदी व खाडी किनारी जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जाधव व उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी केले आहे.






Be First to Comment