अल्प खर्चात बहारदार पीक आल्याने शेतकरी समाधानी — व्ही.एस.लाडगे
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
भारत देश हा नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रगतीपथाकडे जात असताना शेतीला सुद्धा आधुनिक पद्धतीची जोड मिळावी या करीता वेगवेगळ्या यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आल्या आहेत.याच अनुषंगाने पेण तालुक्यातील सापोली पिंपळगाव येथील अनिल चंद्रकांत काणेकर यांच्या दीड एकर शेतामध्ये पेण मध्ये प्रथमच आधुनिक पद्धतीची भात लागवड करून यातून सोन्याचे पीक बाहेर आल्याने शेतक-याला अल्प खर्चात बहारदार शेती घेत असल्याचे त्यांना समाधान झाले आहे असे पेण तालुका कृषी सहाय्यक व्ही. एस. लाडगे यांनी सांगितले आहे.
राज्यातील विविध भागात आधुनिक पद्धतीची भात शेती लागवड करत असतानाच पेण तालुक्यातही अश्याच पद्धतीने लागवड व्हावी याकरिता सापोली पिंपळगाव येथील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर यांच्याशी आम्ही संपर्क करून ड्रम सिडर पेरणी यंत्र या आधुनिक पद्धतीची माहिती देऊन त्यांना या कामी आम्ही प्रेरित केले त्यानुसार त्यांनी या आधुनिक पद्धतीच्या लागवडीसाठी चांगल्या पद्धतीचे सहकार्य देत भात लागवडीसाठी सहकार्य करण्याचे ठरविले असता त्यांना शासनाच्या आधुनिक पद्धतीने नुसार त्यांच्या दीड एकर भात शेतीमध्ये कर्जत ९ या वाणाचे भात लागवडीसाठी देण्यात आले या अगोदर भाताला कीटकनाशक औषध (थायरम) हे लावून (जैविक अझोटो फॅक्टर) बीज प्रक्रिया करून औषध लावून भात लागवड करण्यात आली.
शेतीमध्ये गवत वाढू नये याकरिता (गोल) नावाच्या औषधाची फवारणी करण्यात आली हे सर्व प्रक्रिया पाहण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले तसेच उपविभागीय अधिकारी कैलास वानखेडे यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने लावलेल्या दीड एकरावर भात शेतीवर सोने बहरलेले असून आज कापण्यात आलेल्या या भात शेतीतून कोणताही नुकसान न होता चांगल्या पद्धतीचा भात बाहेर येत असल्याचे पाहता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तर तालुका कृषी अधिकारी कृष्णदेव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत असून शेतकऱ्यांनी त्या माहितीचा योग्य उपयोग केला तर येणाऱ्या काळात भात शेती ओसाड न होता योग्य पीकांने आपले घर भरणार असल्याचे सांगून यापुढे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक सभाजी पोटे यांनी केले आहे.
या अगोदर भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता जास्त कामगार जास्त मजुरी पण पीक अगदी तुरळक हातात मिळत होते मात्र आता शासनाच्या या आधुनिक पद्धतीने यावर्षी पहिल्यांद्याच भात शेती लागवड केली आणि सोन्यासारखा पीक घेतल्याने मला समाधान वाटत असल्याचे शेतकरी अनिल काणेकर यांनी सांगितले आहे.
Be First to Comment