Press "Enter" to skip to content

रिक्षा चालकांच्या मागण्यांना यश

विचुंबे ग्रामपंचायतीचे रिक्षा चालकांनी मानले आभार

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

विचुंबे गावातील रिक्षावाल्यांना अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत पडलेले खड्डे, रबरी गतिरोधक यामुळे सतत अपघात होत असल्यामुळे गाडी चालवणे त्रासदायक होत होते. ही बाब लक्षात घेऊन भैरवनाथ रिक्षा चालक मालक संघटनांचे अध्यक्ष विजय दुन्द्रेकर यांच्या मार्गदर्शकाने सर्व रिक्षा चालकांनी ही समस्या सोडविण्याची मागणी विचुंबे ग्रामपंचायतीकडे केली.

रिक्षांवाल्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत ग्रामसेवक सुहास वारे, सरपंच नम्रता पाटील,उपसरपंच प्रमोद भिंगारकर,माजी उपसरपंच पुरुषोत्तम भोईर,माजी सरपंच अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच किशोर सुरते,माजी उपसरपंच रविंद्र भोईर,सदस्य सुनील सोनावले,सतिश म्हात्रे,रोशन पाटील, सदस्या धनश्री भोईर,संगीता भोईर, निविता भोईर,प्रमिला म्हात्रे,अक्षता गायकवाड,माहिती अधिकारी विनायक भोईर,लेखनिक धर्मेंद्र भोईर यांनी रिक्षानाक्यावर रिक्षा चालक व प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था करून दिली, रस्त्यावरील खड्डे भरले,रबरी गतिरोधक काढून सिमेंटचे गतिरोधक केले.

आपल्या समस्येचे निराकरण केल्या बद्दल अभिनंदन करण्यासाठी माजी सैनिक समिर दुन्द्रेकर आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदधिकरी महेंद्र गावंड,सुरेश भोईर,रंजित भोईर, राजेंद्र भोईर,शशिकांत म्हात्रे,महेंद्र भिंगारकर,उमेश भोईर,दिलीप भोपी, जीवन तुपे,सर्व रिक्षा चालक मालक व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.