सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रायगड जिल्ह्यातील शिक्षक भारतीतर्फे शिक्षक मेळाव्याचे आयोजन खोपोली येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार कपिल पाटील यांच्यासह नरेश पाटील, पंचायत समिती सभापती वृषाली पाटील,उपसभापती विश्वनाथ पाटील आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.यावेळी आमदार कपिल पाटील यांच्याकडून शिक्षक कार्याचा गौरव करून शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात रसायनी येथील जितेश किदकुडे यांना आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
जितेश किर्तकूडे यांनी कोरोना काळात रसायनी परिसरातील गोरगरीब जनतेला मदतीचा हात देऊन अन्नधान्य वाटप केले होते.
शिवाय त्यांनी सांगली पूरग्रस्तांना आपल्या परीने अन्नधान्याचे वाटप करून मदतीचा हात दिला होता.या कार्याची दखल घेऊन त्यांना खोपोली येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला त्यांचे असेच सामाजिक कार्य पुढे चालत राहावे याबदल त्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले आहे. जितेशचा सन्मान झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment