Press "Enter" to skip to content

विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषधार्थ, विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडाच्या वतीने निवेदन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषधार्थ, विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषधार्थ दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रात रझा अकॅडमी व इतर काही संघटनांनी अमरावती, मालेगाव व नांदेड शहरात मोर्चे काढून सुनियोजित हिंसाचार, दगडफेक व शासकीय व वयक्तिक मालमतेची तोडफोड केली. या वेळी काही व्यापारी, दुकानातील महिला कर्मचारी प्रशासकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर सुद्धा हल्ले करण्यात आले.

महाराष्ट्राची पश्चिम बंगाल च्या दिशेने होणारी ही वाटचाल रोखण्यासाठी व स्वसंरक्षणार्थ घटनेनेे दिलेल्या अधिकाराचा वापर करून हिंदू समाज या धर्मांध लोकांना धडा शिकवण्यास सक्षम आहे तरीही या हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या सर्व समाजकंटकांना , आयोजक व संघटना पदाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व पीडित दुकानदार व प्रभावित लोकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व तीव्र शब्दात निषेध नोंदवून विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडाच्या वतीने महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली.

या साठी सदर निवेदन कर्जत तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कुलाबा जिल्हा बजरंग संयोजक श्री साईनाथ श्रीखंडे , कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड बजरंग दल संयोजक कमलाकर किरडे, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, सचिन ठाकूर, दीपक बागडे, संभाजी दौंड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.