सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा धाटाव औदयोगिक क्षेत्रात अनेक केमिकल्स युक्त कारखाने आहेत. मात्र त्यातील काही कारखादारांचा केमिकल मिश्रीत सांडपाणी थेट कुंडलिका नदी पात्रात आल्याने धाटाव पासून रोहा कडे वाहणारी कुंडलिका नदी पूर्णतः प्रदूषित झाली आहे. तसेच दूषित पाणी नदीपात्रात गेल्याने मोठी दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांचा एकच संताप व्यक्त केला जात आहे.
सदरचे कारखानदार यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळांनी अनेकदा धाडी टाकल्या पाहणी देखील केली. परंतु याबाबत कोणतीच ठोस भूमिका अथवा त्यावर उपायुक्त अशी उपाययोजना केली जात नाही. याला जबाबदार कोण असा सवाल व्यक्त केला जात आहे. केमिकल मिश्रीत पाण्याचा त्रास नाहक नदीकाठी वसलेल्या ग्रामस्थ नागरिकांना होत आहे. त्यातच बारमाही वाहणारी ही कुंडलिका नदी तसेच भरती ओठीत असल्याने यात असे पाणी प्रदूषित होत असल्याने या पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. अशा या प्रकाराबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

कारखाने चालले पाहिजे रोजंदारी टिकली पाहिजे असे वाटते. परंतु या प्रकारावर अधिक काही उपाय योजना सदरील औद्योगिक क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी वर्गाने तसेच प्रदूषण मंडळाने करणे गरजेचे आहे. तसेच आशा या सांडपाण्यावर वेळेवर नियोजन करून याची खबरदारी घेत नाहीत यांच्यावर काटेकोरपणे कारवाही केली पाहिजे असे सर्वत्र बोलले जात आहे.








Be First to Comment