सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
अॅटलस कॉप्को व दीपक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबांना मोफत धान्य व ताडपत्री वाटप करण्यात आले.
त्यात अलिबाग तालुक्यातील २१ आदिवासीवाड्या मठ्वाडी, पाठवाडी, दिवीवाडी, वळवलीवाडी, सागवाडी, गंगेचीवाडी, आंबेवाडी, रायशेतवाडी, राजेवाडी, जांभूळवाडी, खैरवाडी, पिंपळवाडी, मोरोंडेवाडी, बारशेतवाडी, सत्तेवाडी, सुडकोलीवाडी, कुसुंबळेवाडी, चिखलीवाडी, कोंझरवाडी, तळाशेतवाडी, पोयनाडवाडी यांतील १५०० कुटुंबांना धान्य वाटप तर वादळात ज्या घरांचे नुकसान झालेले आहे अशा २५० कुटुंबांना ताडपत्री वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी अलिबाग तहसील अधिकारी मा. सचिन सेजल साहेब, महिला व बालकल्याण सदस्या चित्राताई पाटील, आय. सी. डी. एस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, अंगणवाडी सुपरवायझर उल्का कुलकर्णी, सर्व जिल्हा परिषद सदस्य ,सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका व मदतनीस, रेवदंडा कॉलेजचे मुख्याध्यापक तसेच दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वय अजय आवाडे त्यांच्या सोबत मल्लेश हंचली, ओजास्विनी महाडिक, प्रीती जवरत, रोहिणी भगत, तृणाली पाटील, वैभव काटकर यांनी सहकार्य केले.







Be First to Comment