डॉ.राजाराम हुलवान यांचे जितनगर येथे प्रतिपादन
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
गणेशोत्सव अतिशय उत्साहात परंतु साधेपणाने साजरे करणार आहोत कारण कोरोना सारखा महाभयंकर रोग अजून गेलेला नाही अन तिसरी लाट येण्याची भीती आहेच पण ती येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे असे आव्हान जितनगर येथील माणुसकी प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. राजाराम हुलवान यांनी अलिबाग तालुक्यातील जित नगर येथे केले.
डॉ.हुलवान यांनी पुढे सांगितले की, प्रदूषण करून आपणच आपल्याच मुलांना व आपल्या भविष्याला त्रास देत आहोत तर असे काही होऊ नये याबद्दल यावर्षी आपण *निर्मल गणेशोत्सव* साजरा करून समाजामध्ये एक चांगल्या रूढिचा व परंपरेचा आदर्श घालून द्यायचा आहे.त्याकरिता आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून सर्वांपर्यंत निर्मल गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे तसेच निर्माल्य इकडे-तिकडे फेकू नये एका ठिकाणी गोळा करून योग्य त्या ठिकाणी ठेवावी , तसेच गणेश विसर्जन करीता शक्यतो कृत्रिम तलावाचा वापर करावा प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती असेल तर खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्यामध्ये गणेश विसर्जन करावा जेणेकरून पीओपी लवकर विरघळून जाईल व ते उरलेलं पीओपी ची माती आपण झाडांना खत म्हणून घालू शकतो.
Be First to Comment