Press "Enter" to skip to content

किसान काॅंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष मजबूत करणार : जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

केंद्रातील भाजप सरकार हा शेतकऱ्यांचा मुळांवर उठला असून अच्छे दिनाच्या नावाखाली गोरगरिबांना पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,डाळ या दरवाढीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे देशात अनेक काल सत्तेवर राहणा-या काॅग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात जनता काँग्रेसचाच विचार करून पक्षाशी जोडणार असल्याने जिल्ह्यात किसान मोर्चा काॅग्रेच्या माध्यमातून पक्ष मजबूत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्ते पक्षात सामील होत असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येईल. यावेळी जिल्हा सरचिटणीस परशुराम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, चिटणीस निलेश पाटील,माजी सभापती सदानंद म्हात्रे, प्रकाश मोकल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.