Press "Enter" to skip to content

पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ प्रदान

रिष्रा (जि. हुगळी, पश्चिम बंगाल) :
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार सतीश पाटील यांची ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ साठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सेवा जीव कल्याण ट्रस्ट, २२/११, डॉ. पी. टी. लहा स्ट्रीट, रिष्रा, जिल्हा हुगळी (पश्चिम बंगाल) यांच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पत्रकार सतीश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकार सतीश पाटील यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, सामान्य जनतेच्या अडचणी तसेच लोकहिताच्या विषयांना सातत्याने व निर्भीडपणे वाचा फोडली आहे. त्यांच्या या समाजोपयोगी व मूल्याधिष्ठित कार्याची दखल घेत सेवा जीव कल्याण ट्रस्टकडून हा राष्ट्रीय पातळीवरील गौरव करण्यात आला आहे. या सन्माना मुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून, विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.