Press "Enter" to skip to content

ओबीसींची वेगळी आणि इतरांची वेगळी अशा दोन निवडणूक घेऊ नये : प्रकाश आंबेडकर

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

ओबीसींची वेगळी आणि इतरांची वेगळी अशा दोन निवडणूक घेऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले आहे.

महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की जर कोणी न्यायालयात आव्हान दिले तर हा अध्यादेश टिकणार नाही. महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की ओबीसींची वेगळी आणि इतरांची वेगळी अशा दोन निवडणूक घेऊ नये. 

आता जाहीर केलेल्या 105 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका रद्द कराव्यात आणि नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी. अशी मागणी ऍड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.