Press "Enter" to skip to content

रुस्तमजी ग्रुपच्या वतीने ठाणे महानगरपालिकेला  ४५ मजल्यापर्यंत आग विझवणाऱ्या अग्निशमन वाहनांची भेट

सिटी बेल | ठाणे |

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून  व सामाजिक बांधिलकीच्या वचनबद्धतेला अनुसरून, रुस्तमजी अर्बनियाच्या टीमने ठाणे महानगरपालिकेला दोन अत्याधुनिक  अग्निशमन वाहने (एचआरएफएफव्ही) भेट दिली.  

ठाणे प्रशासनाकडून अग्निशामक वाहनांचा वापर प्रभावीपणे उंच वाढत्या आगीवर नियंत्रण करण्यासाठी केला जाईल.  शहरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि  या कार्यक्रमाला अग्निशमन वाहनांच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते.  

ठाणे शहरात वेगाने येत असलेल्या उंच इमारती आणि वाढत्या पायाभूत सुविधांचा विचार करता, रुस्तमजींचा हा प्रयत्न जिल्ह्याच्या स्थानिक संस्थांना प्रभावी क्षेत्र व्यवस्थापनात मदत करेल. ठाणे हा महाराष्ट्रातील सर्वात विकसनशील जिल्ह्यांपैकी एक आहे.  रुस्तमजींच्या लँडमार्क प्रोजेक्ट अर्बनियासह, त्यांनी अव्वल पायाभूत सुविधा आणि सुरक्षा मोजमापांची आवश्यकता ओळखली असून  ठाण्याला परिसर म्हणून विकसित करताना सामुदायिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, रुस्तमजी ग्रुप समग्र परिवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पावले उचलत आहेत. 

ही दोन वाहने उंच इमारतीत लागलेली आग वीजवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे  वाहनात असलेले  विशेष अग्निशमन इंजिन उच्च दाब पंपाच्या  मदतीने ४५ मजल्यांपर्यंत आग विझवू शकतील आणि दुसऱ्या वाहनात १० हजार  लिटर पाण्याच्या टाकीची क्षमता असेल.ही दोन्ही वाहने ठाणे महानगरपालिकेच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत रुस्तमजी अर्बनिया प्रकल्पाचे उपाध्यक्ष मधुसूदन नारायण तसेच रुस्तमजी अर्बनियाचे अग्नि आणि सुरक्षाप्रमुख  श्री सुवेक साळणकर  यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

या उपक्रमाबद्दल बोलताना, रुस्तमजी समूहाचे संचालक, श्री पर्सी चौधरी म्हणाले, “आमच्या प्रकल्पांमध्ये  चांगली सुरक्षा आणि गुणवत्ता तपासणी सुनिश्चित करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे, परंतु संपूर्ण समुदायासाठी सर्वांगीण सुरक्षिततेकडेही  आम्ही खास  लक्ष देतो. आम्हाला या उपक्रमात सहभागी होताना खूप आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की विशेष अग्निशमन वाहनांचा या क्षेत्राला फायदा होईल. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आम्ही तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात  रुस्तमजी अर्बनिया ही प्रीमियम टाउनशिप उभारण्यात यशस्वी झालो असून या टाऊनशिपमुळे ठाणे शहराला एक नवी ओळख मिळाली आहे.आम्ही भविष्यात टीएमसीसोबत ठाणे शहराच्या सुधारणेसाठी जवळून काम करत राहू. ” 

या कार्यक्रमात  जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर, श्री संजय भोईर, अशोक वैती, शानू पठाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख  श्री गिरीश झलके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.