सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
मनापासून काम करणाऱ्या शिवराज युवा प्रतिष्ठान उरण-रायगड, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण, व श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ बोरी उरण या संस्थेच्या सभासदांनी चिपळूण येथे पुरग्रस्थाना त्यांच्यावर आलेल्या संकटातुन सावरण्यासाठी उरण तालुक्यातील तसेच इतर भागातील संवेदनशील नागरिकांनी सहकार्य भावनेतून ज्या गरजेच्या वस्तू दिल्या त्या पुरग्रस्थ व गरजू नागरिकांना त्यांच्या घरात पोहचविण्याचे “कर्तव्य” पार पाडले
गेल्या काही दिवसांपूर्वी महाड, चिपळूण, खेड, कोल्हापूर व इतर काही भागात पावसामुळे पूर आला होता व जनजीवन विस्कळीत झाले होते,तेथील नागरिकांना फक्त जेवणाचे व पिण्याच्या पाण्याचे नाही तर साध्या घालायच्या कपड्यां बाबत पण प्रश्न पडलेला,त्यावेळी आमच्या संस्थेचे गड संवर्धन प्रमुख गणेश तांडेल, धनंजय भोरे,योगेश म्हात्रे यांनी ठरवले आपण आपल्या संस्थे मार्फत ह्या पूरग्रस्तांच्या समस्येवर आपल्या कडून थोड्याफार प्रमाणात काही उपाययोजना करता येते काय ते बघू त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदेश ठाकूर व खजिनदार उमेश वैवडे यांना ही गोष्ट सांगितले व लगेच उरण मधील नागरिकांना आवाहन केले की पूरग्रस्तांना त्यांच्या ह्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार्य करावे,
आणि लगेचच ह्या संवेदनशील नागरिकांना कडून मदतीचा ओघ चालू केला.

फक्त दोन दिवसात एक टेम्पोच्या जागेवर संस्थेला तीन टेंपोचे सामान जमा झाला संस्थेने आपल्या गाड्या कमी करून 3 टेंपो सामानाने भरून व 25 सदस्य घेऊन चिपळूण गाठलं तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नदी पात्राच्या किनाऱ्यावरील गावात प्रत्येक घरात आपले कार्यकर्त्यांनी तीन ग्रुप बनवून आपल्या सामानाचे किट व दोन दोन पाण्याचे बॉक्स, ज्यांना जास्त गरज आहे त्यांना जास्त पाण्याचे बॉक्स,चटई ,पोळीपाट लाटणे, कपडे,टॉवेल,चादरी वाटप केल्या.
तेथील परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती सर्वत्र परिसरात चिखल व कुजलेल्या अन्नधान्याच्या वासामुळे आम्हाला त्रास होत होता मग तेथील नागरिकांची अवस्था काय होत असेल तळमजला व पहिल्या मजल्या पर्यत पाणी चढल्यामुळे सर्व भांडी,कपडे व वस्तू चिखलमय झाल्या होत्या संस्थेचे काही नवीन सभासद ही परिस्थिती बघून अक्षशा रडले पण आपण येथे येऊन आपले कर्तव्य बजावले म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान होते.

ह्या “मदत नव्हे कर्तव्य” हे ब्रीद वाक्य सफल करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यात सौ.कविता म्हात्रे, प्रतीक पाटील (गावठाण), रोहित पाटील (सारडे), राजू मुंबईकर, प्रणय कदम, सत्यजित पाटील, महावीर मेडिकल, जगदीश शाह, द्रोणागिरी गाद संवर्धन, पूजा प्रसादे, योगेश म्हात्रे मित्र मंडळ, सौ. अश्विनी निलेश धोत्रे, सौ. संगीत गावंड, गणेश गिजम, ब्लॅक कॉलर उरण देऊळ वाडी, महेंद्र म्हात्रे, दीपेश पाटील, अंजली कोळवंकर, तन्मय म्हात्रे, गौतमी पूर्व , दशरथ चव्हाण, राजेश कोळंबे, निलेश कदम, संदीप आपणकर, महेंद्र पाटील, विजय गुप्ता , बबलू गुप्ता , हरू शेठ, पांचाळ खानावळ, जिजा चौगुले, जगताप शेठ, किरीट पाटील, बालाजी हेड्डे, निलेशदादा कोर्लेकर, अल्पेशदादा कडू,रुपेश दादा , सत्यवान भगत, शर्मिला सावंत, मयुरी राऊत, पालवी वैवडे, जिगर ठक्कर, दीपक ठक्कर, मनन पटेल, अजित तांबट, श्रीनाथ महोहर हार्डवेअर, दीपेश पाटील,राजू विजू ,आरती पवार, सौ. संध्या घरत, कल्पेश कोळी, नयना धोत्रे, स्वाती धोत्रे, सारिका मोहिते, गीतांजली वालावलकर, विशाल विचारे, पूनम चंद्रकांत म्हात्रे, देवज्ञ ज्ञाती समाज उरण, रुपेश , हितेश साळुंखे, पार्थ शैलेश घरत, कुणाल समेळ, अभिषेक , ताराचंद जैन, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण , वासुदेव माळी, गोविंद, सौ.स्नेहल कोशे, श्रीमती ओटवकर बाई,श्रीमती गुलाब प्रसादे, दिपक पाटील, सुबोध कुंदप, वेल्सन, अमित गावंड, गंधार केशव साळवी, महेश माळी, राजन पाटील, सुरज मढवी, निलेश पाटील, अंजली सीताराम माळी, शिवराज युवा प्रतिष्ठान गड संवर्धन, गणेश तांडेल , गणेश माळी, वैशाली म्हात्रे , तारा माळी, अक्षय संतोष म्हात्रे (बदलापूर), मनाली सावंत, वैभव आर्टस् आणि के.डी.एस. कॉलेज थिएटर ग्रुप, गौरव सरफरे,सिद्धेश मोरे,सतीश पाटील,दीपक दळी हे व इतर अनेकानी भरगोस सहकार्य केलं त्यात महत्वाचं सौ.अश्विनी निलेश धोत्रे,राजूशेठ मुंबईकर(वेश्वि),अक्षय संतोष म्हात्रे (बदलापूर),निलेशदादा कोर्लेकर,अल्पेशदादा कडू सचिनदादा ढेरे व मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी महत्वाची मदत केली तसेच काहींनीतर नाव न सांगता मदत केली या सर्वांच्या सहकार्यानेच आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडता आलं
शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ठाकूर उपाध्यक्षा सौ.संगिता ढेरे, खजिनदार उमेश वैवडे,सहचिटणीस योगेश म्हात्रे,सहखजिनदार सौ.पूजा प्रसादे, सरचिटणीस सचिन भोईर, सौ.कविता म्हात्रे,विद्या पाटील,अमर ठाकूर,दिनेश हळदणकर,सुभाष पाटील,दत्ता पाटील ,सुभाष तांबे,सागर कांबळे,अनिल प्रधान,साहिल प्रसादे,नचिकेत ढेरे,श्रध्दा सबुरी पदयात्रा मंडळ बोरी चे अध्यक्ष धनंजय भोरे,कल्पेश ठाकरे,सुयोग ठाकूर,सुरेश अय्यर,प्रशांत शिर्धनकर सुजित अस्वले विशाल तांडेल आणि सभासद, शिवराज युवा प्रतिष्ठान गड सवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश तांडेल,गणेश माळी,राजा नाईक, यज्ञेश म्हात्रे,महेश जाधव,यतिश म्हात्रे,विरेंद्र जाधव, रवी म्हात्रे,लक्ष्मण कातकरी,अजय कातकरी,विजेंद्र पवार,आकिब व कौशिक म्हात्रे ,हेमंत म्हात्रे,आणि कार्यकर्ते,श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेचे पदाधिकारी व शिवराज युवा प्रतिष्ठानच्या महिला विभागाच्या सौ.अनघा ठाकूर,सौ.सुप्रिया सरफरे, सौ.वैदही वैवडे,सौ.विशाखा म्हात्रे,सौ.अर्चना साळुंखे,सौ.छाया तांडेल,सौ.सीमा निकम,अश्विनी माळी , नव्या माळी,कुमारी ऐश्वर्या साळुंखे,कुमारी श्रेया ठाकूर,सुकन्या निकम,गुंजन निकम इत्यादी महिलांनी खूप मेहनत घेऊन पुरग्रस्थ बांधवाना देण्यात येणाऱ्या किट चे पॅकिंग केले विशेषतः महिलांना उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स व अंतर्वस्त्रच्या योग्य पॅकिंगमुळे तेथील महिलांनी आम्हाला फोन वरून व शोशल मीडियावरून धन्यवाद दिले.








Be First to Comment