सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनीतील तूराडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग ठाणे अंतर्गत पेन कार्यालयातर्फे प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांचे मार्गदर्शनात खावटी योजने अंतर्गत तूराडे येथील प्रदीप माळी यांच्या रेशनिंग दुकानासमोर 38 आदिवासी बांधवांना खावटी योजनेचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.
या किटमध्ये पुढील प्रमाणे मटकी एक किलो, चवळी दोन किलो, हरभरा तीन किलो पांढरा वाटाणा एक किलो, तूरडाळ दोन किलो ,मीठ तीन किलो, साखर तीन किलो, गोड तेल एक लिटर, मिरची पावडर एक किलो, चहा पावडर अर्धा किलो असा 18 वस्तूंचा भरगच्च कीट देऊन या व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रुपये 2000 जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे या कोरोना च्या परिस्थितीमध्ये रोजगार कमी झाल्याने या मिळालेल्या मदतीमुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यावेळी या कार्यक्रमास तूराडे ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच विश्वनाथ गायकवाड ,सदस्य प्रतिभा कोणकर, युवा कार्यकर्ते मयूर शेट ठाकूर, मयूर चव्हाण प्रदीप माळी, आतिश ठाकूर, भाऊ ठाकूर, प्रकाश माळी आणि प्रकल्प कर्मचारी विठ्ठल पांढरे आणि मंगेश उकिरडे उपस्थित होते.
Be First to Comment