Press "Enter" to skip to content

रसायनीत लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी,लसीच्या अपु-या पुरवठ्यामुळे निराशा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली.लस आली असली तरी कोरोनाचे संकट पुर्णपणे दूर झालेले नाही.त्यामुले लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे.शासनाकडून पुरेशी लस मिळत नसल्याने सरकारी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होते.

रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा, रिस,वाशिवली,दापिवली आदी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी उसळणारी गर्दी पाहता सामान्य नागरिक वैतागला आहे.कोरोनावर प्रतिबंधात्मक लस घेण्याऐवजी कोरोनाला आमंत्रण मिळत असल्याचे या लसीकरण केंद्रावर पहावयास मिळत आहे.पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर नंबर लावून आठ-नऊ तास ताटकळत राहूनही कमी लससाठा आल्याने पुन्हा निराश होऊन नागरिकांना घरी परतावे लागत आहे.४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी दुसऱ्या डोसला प्राधान्य असतानाही काही ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर तसे होताना दिसत नाही.

परिसरातील काही लसीकरण केंद्रावर‌ तीस ते चाळीस डोस एका दिवशी तर तीन दिवस बंद असा प्रकार परिसरात असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची रोजची गर्दी पाहावयास मिळत आहे.

सध्या शासकीय केंद्रांवर लस कधी उपलब्ध होईंल,याची शाश्वती नाही,लस उपलब्ध झाल्यावर सर्वच केंद्रांवर गर्दी उसळते.परीसरात पुरेशा लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात पैसे देवून लस घेत असल्याचे दिसून येते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.