सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
शेतकरी कादंबरीकार र.वा.दिघे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी(१२५) जयंती निमित्ताने कोंकण मराठी साहित्य परिषद चौक व नेताजी पालकर मंडळ, चौक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य पातळीवरील खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धेचा विषय –
“शेतकरी कादंबरीकार र.वा.दिघे यांचे जीवनकार्य व त्यांच्या कादंबऱ्यांतून चितारलेले शेतकरी जीवन” असा आहे.
सदर स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
निबंधाची शब्दमर्यादा २००० शब्द इतकी असेल.
स्पर्धकांनी आपले निबंध कगदाच्या एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात संदर्भासह लिहिण्याचे असून निबंधासोबत नाव, गाव, शिक्षण , व्यवसाय, जन्म तारीख , पत्ता , मोबाईल क्रमांक, साहित्य संस्थांशी सहभाग (असल्यास), मिळालेले पुरस्कार यांचा उल्लेख असलेला स्वतंत्र कागद जोडवयाचा आहे.
भागूबाई गोपाळ सकपाळ प्रतिष्ठान चौक, जि- रायगड तर्फे १ ते ५ क्रमांकाना रु.१०००/- , रु.७५०/-, रु.५००/-, रु.३५०/-, रु.२५०/-ची बक्षिसे (पुस्तक रुपात), सन्मान चिन्ह, तसेच e-सर्टिफिकेट देण्यात येतील.
बक्षीस समारंभ १२५ व्या जयंतीनिमित्ताने आयोजित समारंभात बुधवार, दिनांक- २१/०४/२०२१ रोजी खोपोली, ता- खालापूर, जि- रायगड येथे मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतील.
स्पर्धकांनी आपले निबंध स्वतः किंवा पोस्टाने १५ एप्रिल २०२१ पर्यंत स्पर्धा प्रमुख किंवा स्पर्धा संयोजक यांचेकडे खालील पत्त्यावर पाठवावेत असे आहेत.
भूषण जयवंत पिंगळे यांनी सांगितले आहे.







Be First to Comment