Press "Enter" to skip to content

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिस-प्रशासन यांना निवेदने

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. दुर्दैवाने या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी दारु पिऊन धिंगाणा घालणे, रासायनिक रंग फासणे, महिलांना पाण्याचे फुगे मारणे, त्यांची छेड काढणे असे ग़ैरप्रकार होतात. होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे हे ग़ैरप्रकार रोखून या सणाचे पावित्र्य राखले जावे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलिबाग येथील रायगड पोलिस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम, श्री.राजेंद्र पावसकर, श्री.उमेश आठवले, सनातन संस्थेच्या सौ.विशाखा आठवले आणि धर्मप्रेमी श्री. मनेक पटेल उपस्थित होते. त्याचप्रमाणे पनवेल,पेण येथे तहसीलदारांना तसेच नागोठणे, कोलाड, पेण, पनवेल आणि खोपोली येथील पोलिस ठाण्यात ही निवेदने देण्यात आली. याच आशयाचे निवेदन नवी मुंबई पोलिस आयुक्त यांना इ-मेल द्वारे पाठविण्यात आले. होळीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु बांधव आपल्या प्रथा-परंपरापासून वंचित व्हावेत यासाठी 'कचऱ्याची होळी करा' असा स्वरूपाचा अपप्रचार तथाकथित पुरोगाम्यांकडून केला जातो. हिंदू बांधवांनी अशा प्रकारच्या अपप्रचाराला न भुलता होळीच्या निमित्ताने धर्मशास्त्रसंमत असे सात्त्विक धर्माचरण करावे. होळीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजप्रबोधन करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.