सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यत ताज्या भाजीपाल्याच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील ताजी भाजी बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांची या भाजीस पहिली पसंती मिळत आहे.
या गावातील भाजी पाल्याचा व्यवसाय हा पिढीजात व्यवसाय असून पिढ्यानपिढ्या जतन करून.ठेवला आहे. आज या व्यवसायात गावातील चौथी पिढी मेहनत घेत असून शिकली सवरलेली तरूण मूले मूलीही मोठ्या आनंदाने शेतीची कामे करीत असताना दिसत आहेत.पिढीजात व्यवसाय असल्याने या व्यवसायाचा अनुभवही प्रत्येकाच्या गाठशी चांगला आहे.त्यामुळे शेतीतून अधिकाधिक चांगले पिक कसे काढता येईल यासाठी सर्व कुटुंबाचे निकराचे प्रयत्न चालले असतात .सद्य स्थितीत वांगे,टा्मेटो,मिरची,कोबी,गाजर, शिराळे,भोपळे,पडवळ,दूधी,भेंडी आदींसह मुळा,मेथी,माठ,पालक इ.पालेभाज्यांचीही पिके घेतली जात आहेत.तसेच झेंडूच्या फुलांचेही चांगले उत्पादन काढले जात आहे.
चालू हंगामात सुरूवातीची लागवडीची कामेही योग्य वेळेत व योग्य कालावधीत उरकण्यात आली असल्याने व सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे रोगाची लागण झाली नसल्याने पिकेही दमदार आली आहेत .त्यामुळे शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला आहे.दररोज शेतीतून मुबलक पिक निघत असल्याने डोक्यावर टोपले घेऊन तालुक्यातील विविध गावात फिरून तसेच चणेरा,कोलाड व रोहे येथील आठवडा बाजारात विक्रीकरिता आपला शेत माल संपविण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे.
गावातील शिक्षणाचे प्रमाणही चांगले असल्याने शिकली सवरलेली तरूण पिढीही घरातील वरिष्ठांना शेतीच्या कामात सहकार्य करतात.तर भाजी पाल्याची शेती हा येथे पिढीजात व्यवसायामुळे या व्यवसायातील बारकावे व कौशल्ये येथील शेतकरी ग्रामस्थांनी चांगले अवगत केले असल्याने नैसर्गिक खतांच्या वापरावर अधिक भर व कमीत कमी किटकनाशकांचा वापर यामुळे येथील भाजीस ग्राहकांची पहिली पसंती मिळत असल्याचे.पहावयास मिळत आहे.







Be First to Comment