दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्यावर जून्या आठवणीत नव्याने पुन्हा एकदा वर्गमित्र हरवले बालपणात !
सिटी बेल लाइव्ह । रायगड । मुकुंद रांजाणे ।
“घटका गेली पळे गेली ताश वाजे घनाना आयुष्याचा नाश होतो तू राम का रे म्हणेना” या समर्थांच्या ओवीप्रमाणे आजवर आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे एखाद्या स्वप्नाप्रमाणे निघून जात असताना बालपणापासून आपल्या सोबत शालेय जीवनात सोबत असलेल्या वर्गमित्र मैत्रिणी यांच्या शालेय जीवनानंतरच्या संसारिक तसेच व्यावहारिक जीवनात काय काय नवनवीन आमूलाग्र बदल झाले आहेत.त्याचा लेखाजोखा हा केवळ सारे बालमित्र एकत्रित आल्याशिवाय आपल्या सुखदुःखात सहभागी आणि वाटणी करू शकत नाहीत त्यासाठी गेट टुगेदर हाच एकमेव पर्याय असतो आणि त्यासाठी आपल्या या सर्व मित्र मैत्रिणींना व्हाट्स अप सारख्या व्यासपीठावर एकत्रित आणून एकमेकांच्या व्यथा आणि सुखदुःख शेअर करताही येतात.
दरवर्षी १९८७ या दहावीच्या बॅचचे सखेसोबती गेट together माथेरान मध्ये एकत्र येऊन करीत असतात. परंतु यावेळी आम्ही या मंडळीने आपल्याच दोन वर्गमित्रांच्या आनंदी क्षणात सहभागी होण्यासाठी एकत्रित आले तेसुद्धा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्यावर आणि जून्या आठवणीत नव्याने पुन्हा एकदा हे सर्व वर्गमित्र हरवलो होते आपल्या बालपणात !
आपल्या आयुष्याची 50 वर्ष पूर्ण झाली.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…सर्व शालेय मित्र पुन्हा एकदा वर्षातून एकत्र येतात एकत्र येण्यासाठी निमित्त शोधत असतात , असाच सरस्वती विद्या मंदिर माथेरानच्या सन 1987 ची 10 वी बॅचचे वर्गमित्र महाड येथे रायगड किल्यावर एकत्र आले ,
निमित्त आपल्या वर्ग मित्र सागर पाटिल यांचा 50 सावा वाढदिवस व महाड येथे पेशवे सरदार बालकांजी राव पालाडे यांना छत्रपती शिवाजी महाराज्यानी इनाम दिलेले गाव तेटघर येथे आपल्या मित्र संजय पालांडे यांच्या नवीन घराचे वास्तू पूजन, दोन्ही मित्रांचे शुभ कार्य ह्या पावन पवित्र भूमीत साजरा केला खुप आनंदित योगायोगाने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गेली कित्येक दिवस व्हॉटस अप वर एकत्र येण्याच्या गप्पाना आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीत खुदद रायगडावर येण्याचा योग आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत किल्ल्यावरील ह्या ऐतिहासिक सर्व स्थळे बघताना शालेय जीवनातील सर्व जुन्या नवीन आठवणीना उजाळा देत वयाच्या 50 व्या वर्षी ही क्षणा क्षणाला हास्य, गमती , होत होत्या.आपल्या कुटूंबापासून दूरअसताना आज फक्त आपले बालपण आणि आपले लंगोटी मित्र, शाळेत कधी एवढा गोंधळ घातला नसेल तेवढा गोंधळ आज एकमेकांच्या शालेय जुन्या आठवणी शिक्षकांचा मार शाळा असा सर्वच गोष्टीच्या चर्चा करताना होत होता आयुष्यात खूप सुख दुःख प्रसंग आले.अनेक मित्र मैत्रिणी आज चांगल्या हुद्यावर काम करत आहेत, आजचा गेट टू गेदर आयुष्यातील अत्यन्त अविसमरण ते ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्यावर आपल्या मित्राचा 50 वा वाढदिवस व गृह प्रवेश हे सारे एखादया दुग्धशर्करा योगाप्रमाणे जुळून आले होते.








Be First to Comment