सिटी बेल लाइव्ह । उरण (घन:श्याम कडू) । 🔷🔶🔶🔷
उरण सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर दोन 108 अॅम्ब्युलन्स उरण तालुक्याला मंजूर केल्या होत्या. त्यानुसार दोन ते अडीज महिने उरणकरांना सेवा मिळाली त्यानंतर गेली एक वर्ष कोरोना महामारीतही 108 सेवेला फोन करून 2 तासाच्या आत अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. तरी याची चौकशी करून उरणकरांना त्वरित 108 अॅम्ब्युलन्सची सेवा मिळावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी केली आहे.
मा. मुंबई उच्च न्यायालयातील ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी उरण सामाजिक संस्थेच्या जनहित याचीकेच्या अनुषंगाने बी. व्ही. जी. कंपनीचे मालक जे राज्यात 108 अॅम्ब्युलन्सची सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांना दोन 108 अॅम्ब्युलन्स उरण तालुक्याकरीता ज्या मंजूर आहेत. त्या तात्काळ सूरू करा म्हणून सांगीतल्याप्रमाणे दोन ते अडीच महिने 108 अॅम्ब्युलन्सची सेवा उरण करांना मिळाली. परंतू त्यानंतर गेले एक वर्ष प्रामुख्याने या करोना कोविड 19 या माहामारीच्या काळात जिथे पेशंटला रूग्ण घेऊन जाणे करिता 108 सेवेला फोन केल्यावर दोन तासांच्या आत एकदाही अॅम्ब्युलन्स सेवा मिळालेली नाही .
या बाबत सातत्याने डिस्ट्रीक्ट को ऑर्डीनेटर किरण गायकवाड यांच्या हे अनेक वेळेला लक्षात आणून दिले आसतानाही सदर अॅम्ब्युलन्स उरणवासियांना उपलब्ध होत नाही. हे उरणकरांचे दुर्दैव आहे. सदर अॅम्ब्युलन्स जर उरणकरीता मंजूर आहेत आणि त्या इतर तालुक्याच्या नावाने वापरल्या जात असतील तर हा फार मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी डिस्ट्रीक्ट कोऑर्डीनेटर किरण गायकवाड यांच्याकडे व्यक्त केले आहे.
तसेच सदर अॅम्ब्युलन्स दोन – तीन तासांनंतर कधीही वेळेवर रूग्णांना उपलब्ध न झाल्यामुळे रूगालयात रूग्ण उशीरा पोहोचल्यामुळे रूग्णांची अवस्था गंभीर झाली आहेत. अशी अनेक उदाहरण सांगता येतील . तसेच या बाबत मा प्रधान सचीव , आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे चौकशी करण्याबाबतचा पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगूनही 108 अॅम्ब्युलन्स सेवेत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. तरी याची चौकशी करून उरणकरांना त्वरित 108 अॅम्ब्युलन्सची सेवा मिळावी अशी मागणी संतोष पवार यांनी केली आहे.








Be First to Comment