
1964 मध्ये बांधलेले पनवेल पालिकेचे हक्काचे देरंग धरणाच्या आणि साठ्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून गहन झाली आहे तसेच यावर्षीचे तीव्र उष्णतेच्या प्रभाव आणि बाष्पीभवन यामुळे घरातील पाणी कमी होण्याची तीव्रता अधिक जाणवली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या यंत्रणे कडून पनवेल महानगरपालिका पाणी विकत घेऊन जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आटोकात प्रयत्न करीत आहे.
पाणी टंचाई वर कायमचा तोडगा काढण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिका संयुक्तपणे दीर्घकालीन योजनेवरती काम करत आहे तोपर्यंत आणि त्यांच्यावरती नागरिकांनी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन आणि इतर लोकसंख्या वाढीसाठी पोषक असलेली परिस्थिती बघता पनवेलमध्ये भारतीय शहरीकरण लक्षात घेता आणि त्यांचाही यापेक्षाही तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून व पाणी वापराच्या संदर्भामध्ये सगळ्या नियमांचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करुन पनवेलची वैभवशाली परंपरेला गालबोट लागणार नाही मोठमोठे प्रकल्प आणि शहराचा हो घातलेला विस्तार अविरतपणे सुरू राहावा याकरता कटीबद्ध रहावे अशी विनंती आहे
शिवदास कांबळे माजी नगरसेवक
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी



Be First to Comment