Press "Enter" to skip to content

दि बां च्या नावासाठी पत्रकार जाणार दिल्ली दरबारी

 
विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सिडको आग्रही असल्याचे आश्वासन ; आश्वासनानंतर पत्रकारांचे धरणे आंदोलन स्थगित

सिबीडी – बेलापुर : राज भंडारी 

पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा दिला असता, सदर आंदोलन स्थगित करावे यासाठी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, सिडकोचे दक्षता मुख्य अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांच्याशी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणत बैठकीचे आयोजन केले. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी आयोजित बैठकीमध्ये सिडको प्रशासन हे स्व.लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही असून आजपर्यंत विमानतळ नामकरणाचे जे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, ते फक्त आणि फक्त दिबांच्या नावाचेच असल्यामुळे स्थानिकांसह लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यामुळे सिडको प्रशासन तथा विमानतळ प्राधिकरण देखील आपल्या भावना समजून घेत दिबांच्या नावासाठी प्रयत्नशील असल्याचे आयोजित बैठकीत आश्वासित करण्यात आले. 

यावेळी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापकशंतनू गोयल यांनी सांगितले की, पत्रकारांच्या भावना या राज्य शासनापर्यंतच नव्हे तर केंद्र शासनापर्यंत थेट पोहोचविणार असून, केंद्र शासन आपल्या भावनेची दखल घेईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. सिडकोचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनीही सिडकोची भूमिका स्पष्ट करून विमानतळ प्राधिकरणाची माहिती दिली. इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार प्रथमच एकत्र येऊन दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे पाहून आपणही प्रभावित झालो असून, यापुढील भूमिका पत्रकारांनाही विश्वासात घेऊन स्पष्ट केली जाईल, असे आश्वासित केले. 

प्रारंभी पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय कडू, माधव पाटील, विवेक पाटील, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, साहिल रेळेकर, रविंद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, अनिल राय, शंकर वायदंडे, आप्पासाहेब मगर, संतोष वाव्हळ, भरतकुमार कांबळे, सुनील पाटील, शैलेश चव्हाण, साबीर शेख, दिपाली पारसकर, सनीप कलोते, गौरव जहागीरदार, चंद्रकांत शिर्के, सुनील वारागडा, असीम शेख, अण्णासाहेब आहेर, सुभाष वाघपंजे, सुधीर पाटील, तुलसीराम बोरीले, दिपक कांबळे, जितेंद्र गावडे, नवी मुंबईतील पत्रकार दिनेश पाटील आदी उपस्थित एकूण ३५ पत्रकारांनी धरणे आंदोलनाबाबत आपली भूमिका विशद केली. सदर धरणे आंदोलनाबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच गोपनीय पोलीस अधिकारी चेतन अहिरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आम्ही आजचे आंदोलन जरी स्थगीत केले असले तरी दी बा पाटील यांचे नाव न देता जर का नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही नक्की आंदोलन करू असे यावेळी पत्रकारांनी स्पष्ट केले. तसेच यापुढेही आम्ही गप्प बसणार नसून लगेचच केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार तसेच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री श्री किंजरापु राम मोहन नायडू यांची भेट दिल्ली येथे जाऊन घेणार असल्याचा निर्धार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.