Press "Enter" to skip to content

“जॉय” चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुंबई (पी. डी.पाटील): महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य जॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता विद्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, ऍड जगदीश जायले, डॉ महेश अभ्यंकर, सत्येंद्र सामंत, ऍड रूशीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मान केला. शुद्ध आणि प्रामाणिक भावना ठेवून जॉय कार्य करीत असल्याने यासारखी अनेक संस्था निर्माण व्हायला हव्यात असे दौंड म्हणाले. यावेळी अस्मिता चे संस्थापक दादा पटवर्धन शिक्षकांचे नेते जनार्दन कांगळे सर, तसेच ज्येष्ठ वृत्त पत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.