Press "Enter" to skip to content

भारतीय जनता पार्टी आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई (पंकजकुमार पाटील) : दिनांक ८ जून २०२५ रोजी वॉर्ड क्र. ११७ मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीवर्षा निमित्त १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टी व श्री. रविंद्र नारायण कदम( माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ,ईशान्य मुंबई )यांच्या आयोजनाखाली डी.ए व्ही. कॉलेज, सभागृह, भांडुप (पूर्व) याठिकाणी यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष मा. दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी आमदार मा. मंगेश सांगळे, माजी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, श्री युवराज मोरे जी अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष, विक्रोळी विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. रजनी रविन्द्र कदम ताई, विक्रोळी पूर्व मंडळ अध्यक्ष केतकी सांगळे, सौ श्रुती घोगळे वॉर्ड अध्यक्ष – ११९ आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती व प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना एम. आर क्लासेसचे मर्विन सर यांचे मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात कांजूरमार्ग (पूर्व) परिसरातील जवळपास २५० गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी वॉर्ड अध्यक्ष सचिन करंजे, मंडळ अध्यक्ष अमोल पोखरकर, युवा वॉर्ड अध्यक्ष अभिषेक ढोले, जिल्हा पदाधिकारी स्नेहा जंगम, प्रवीण सरवणकर, संदीप फगरे, महेश चव्हाण, नरेश चव्हाण, वीरेंद्र महाडिक, सुनील जोशीलकर, धनंजय देऊळकर, जोतिबा जाधव, दशरथ घेवडे, किशोर जोशी, प्रीती जैन, जागृती नर, प्रणाली जाधव, सरोज विश्वकर्मा, गणपत भणगे , रितेश आजगावकर, राज विचारे, राहुल तिवारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.