
शाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिना सोबत पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली.
कारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार. मोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला. पण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज. तीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड.
आजपासून ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कादंबरी अवश्य वाचा आणि घरातील लहान मुलांनाही वाचायला द्या.
कादंबरी – उंबरखिंड
लेखक – नितीन अरुण थोरात
उंबरखिंड कादंबरी मूळ किंमत 350 रुपये, मात्र प्रिबुकिंग सवलत किंमत 300 रू + पोस्टल चार्जेस फ्री..
एकूण 300 रू
Google pay / phone pe
The Book Distributor – Santosh
8999360416
पेमेंट केल्यावर एक स्क्रीनशॉट पाठवावा..




Be First to Comment