


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
पनवेल (प्रतिनिधी) प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः,अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन आज (०६ एप्रिल) पनवेलमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
१९८० मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती.भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. स्थापना दिनाच्या अनुषंगाने राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून संबोधित केले.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागातील तोंडरे येथे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी खारघर कार्यालयात, पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे त्या त्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन संवादाचा लाभ घेतला.

भारतीय जनता पार्टीच्या आजच्या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खचल्या. तसेच पक्षाने कार्यकर्ते, पदाधिकार्यांना ताकद दिली. प्रत्येक कार्यकर्त्यात पक्ष वाढीची जिद्द पहायला मिळाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल नेतृत्वात विधानसभेतील अभूतपूर्व यश मिळवले. सध्या संघटनपर्वाच्या माध्यमातून पक्ष मजबूत होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तब्बल ०१ कोटी ५१ लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. संघटन मजबुतीकरण व विस्ताराचा हा भलामोठा पल्ला पक्षश्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भरवशावर, त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आधाराने पूर्णत्वास गेला. महाराष्ट्र काबीज करण्याच्या महाविजय मोहिमेचा प्रारंभ शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनाने झाले. आणि हे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले. भारतीय राजकारणात भाजप आता केंद्रस्थानी आहे आणि त्या स्थानावरून भाजपला बेदखल करणे अन्य पक्षांसाठी सोपे नाही. एकेकाळी ज्या भाजपला राजकीय परिघाबाहेर ठेवण्यासाठी विरोधकांनी आटापिटा केला, त्याच भाजपने सिद्ध केलेल्या विषयसूचीवर देश प्रगती करत आहे. देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी दूरदृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळेच भाजप आणि सर्वसामान्य माणूस यांचे नाते घट्ट झाले आहे. आणि त्याचकारणाने भाजप हा जगातील सर्वात मोठा व क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. ०६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिवस म्हणून देशभरात, राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गर्शनाखाली पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर तसेच पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी जनसंपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गर्शनही प्रत्येक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वरूपात घेतले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा गगगभेदी घोषणा देत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीने भारलेले होते आणि उपस्थितांनीही एकत्र येऊन राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

Be First to Comment