सिटी बेल | पेण | वार्ताहर |
डोणवत येथील असणारी उत्तम गॅल्वा स्टील कंपनीच्या कामगारांचे मागच्या सात आठ वर्षांपासून रोखून ठेवलेली वेतन वाढ कंपनी प्रशासनाने तात्काळ देण्यात यावी अन्यथा याकरिता कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागले असे वक्तव्य कामगार भारती माथाडी कामगार युनियनचे संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटील यांनी केले आहे.
उत्तम गॅल्वा स्टील मिमिटेड कंपनीने सात आठ वर्षा पासून सुमारे ४५० कामगारांचे वेतन वाढ रोखले असून यामुळे कामगारांमध्ये कंपनी व्यवस्थापना विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.या कंपनीतील व्यवस्थापनेने कामगारांचे वेतन करार अथवा वेतन वाढ न दिल्याने या बाबत कंपनीने केलेला आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कामगारांनी कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासदत्व स्वीकारले असल्याने यामुळे या कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार भारती माथाडी युनियनच्या माध्यमातून लढा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सदर अन्यायग्रस्त कामगारांना संघटनेच्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तसेच गरज भासल्यास आंदोलन किंवा संप पुकारून व्यवस्थापने विरोधात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला असल्याने कामगारांची एकजूट पाहता कंपनी व्यवस्थापनाने त्वरित कामगारांचे वेतनवाढ देण्यात यावे अन्यथा कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक होईल व त्यास कंपनी व्यवस्थापनच जबाबदार राहील अशी माहिती युनियनचे संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.
Be First to Comment