सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा परिसरातील समाजसेवक किरण रघुनाथ माळी यांचे वडील माजी सैनिक रघुनाथ नामदेव माळी यांचे अनंत चतुर्दशीला पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
कै.रघुनाथ माळी यांनी युध्दात देशासाठी महत्वाची कामगिरी केली आहे.त्यांच्या पार्थिवावर आज तिरंग्यात कासप स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जय जवान,जय किसान,भारत मातेकी जय अशा आरोळ्यांनी त्यांना अंतिम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील कासप गावातील समाजसेवक किरण माळी यांचे वडिल मिलिटरी सैनिक कै.रघुनाथ नामदेव माळी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अनंत चतुर्दशी दिनी अल्पशा आजाराने निधन झाले.कै.रघुनाथ माळी हे यांनी सन 1965,1971,1975 च्या देशाविरोधातील युध्दात महत्वाची कामगिरी केली.त्यांनी युध्दात अनेकांचा खात्मा केला.माझ्या आईंवडिलांनी मला देशसेवेसाठी अर्पण केल्याचे ते यावेळी इतरांना सांगत.त्यांनी वीसवर्षांपेक्षा अधिक काळ देशसेवा केल्याचे समजते.
ते अष्टपैलू होते.लाठिकाठी, नेमबाजी, दांडपट्टा चालविणे यात माहिर होते.तर जवळपास एक किलोमीटर हातावर चाळणे याची सवय झाली होती. आपल्या भारत देशासाठी माझा स्वता:चा जीव गेला तरी चालेल पण शेवटचा श्वास असेपर्यंत विरोधकांना सलोकी पळो करेन या विषयावर ठाम असायचे. रघुनाथ माळी यांचे निधन झाल्याचे वृत्त परिसरात समजताच सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा टाकून कासप ते कासप स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी स्मशानभूमीवर अनेकांनी कै.रघुनाथ माळी यांचे गुणगान गावून देशासाठी महत्वाची कामगिरी केल्याचे सांगितले.यानंतर तिरंग्याला सलामी देत भारत मातेकी जय,जय जवान-जय किसान’असा नारा देत कै.रघुनाथ नामदेव माळी या देशसेवकाला अखेरचा निरोप देण्यात आला.
Be First to Comment